शिरवळचा इतिहास
शिरवळ हे खंडाळा तालुक्यातील औद्योगिक विकास झालेले हे छोटेशे गाव आहे. हे निरा नदी काठावर वसलेले आहे. हे गाव सातारा व पुणे या दोन जिल्ह्याचा सीमेवर वसलेले आहे.
धार्मिक ठिकाणे
अंबिका मंदिर
हे
गावातले सगळ्यात महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. अंबिका माता हे ग्रामदैवत
असून वैशाख महिन्यात अक्षय्य तृतीयेला गावात मोठी यात्रा भरते. मंदिरातील
मूर्ती पुरातन काळातील आहे. इथे प्राचीन लेणी पण आहेत हे फारच थोड्या
जणांना माहित आहे
भैरवनाथ मंदिर
हे
गावातील दुसर्या क्रमाकांचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पुरातन असून
यात्रा व इतर सर्व महोत्सवांमध्ये या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
केदारेश्वर मंदिर
या
पुरातन शिवायालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या
मंदिरातून शुभानमंगल किल्ल्यावर जायला भुयारी मार्ग होता. संकटाच्या वेळी
या मार्गाचा उपयोग होत असे, असा उल्लेख सापडतो

.
मंडाईदेवी मंदिर
हे मंदिर नदीकिनारी असून अतिशय पुरातन आहे. गावच्या यात्रेच्या वेळी या देवीलासुद्धा खूप महत्त्व येते.
रामेश्वर मंदिर
हेही
मंदिर नदीकिनारी असून बस स्थानक ते मंदिरापर्यंत जाणारा रस्ता गावाच्या
मध्यभागातून व मुख्य बाजारपेठेतून जातो. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि
निसर्गरम्य आहे. येथून शुभानमंगल किल्ल्याचे दर्शन घडते.
-: सुभामंगल किल्ला :-
इतिहासात गाजलेल्या भुइकोटात शिरवळचा सुभामंगल एकेकाळी अग्रस्थानी होता. निरानादिच्या दक्षिण तीरावर असणारा हा बलदंड कोट अनेक तोंड देत सुमारे २३६ वर्षे उभा होता. या किल्याचा अजून इतिहास म्हणजे या किल्यावर शिवाजी महाराजांची पहिली लढाई झाली.
शिरवळ पोस्ट ऑफीस :-
ग्रामपंचायत शिरवळ
एस टी स्टॅन्ड शिरवळ
No comments:
Post a Comment